प्र. 1. ( अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा : (1) ) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ----...
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा :
(1) ) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ---------------- शहराचे उत्खनन करताना(क) उर (ड) कोलकाता
(2) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री --------- हे होते.
(अ) वसंतराव नाईक (ब) यशवंतराव चव्हाण
(क) शंकरराव चव्हाण (ड) वसंतदादा पाटील
उत्तर : यशवंतराव चव्हाण
(3) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ------------- यांनी केला.
(अ) जेम्स मिल (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (ड) जॉन मार्शल
उत्तर : फ्रेडरिक मॅक्सम्युलर
( उत्तर पत्रिकेत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहावीत व योग्य पर्यायाला अधोरेखित करावे.)
SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key
प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
{1}
(i) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(ii) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(iii) साप्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(iv) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
उत्तर : एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
{2}
(i) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(ii) मायकेल फुको - आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
(iii) कार्ल मार्क्स - दास कॅपिटल
(iv) रेने देकार्त - रिझन इन हिस्टरी
उत्तर : रेने देकार्त - रिझन इन हिस्टरी
{3}
(i) प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
(ii) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
(iii) दीनबंधू - कृष्णराव भालेकर
(iv) केसरी - बाळ गंगाधर टिळक
उत्तर : प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
प्र. 2. (अ) दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
[1] पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा :
- कोलकाता → नॅशनल लायब्ररी,
- दिल्ली → नेहरू मेमोरियल म्युझियमअँड लायब्ररी,
- हैदराबाद → स्टेट सेंट्रल लायब्ररी,
- मुंबई → लायब्ररी ऑफ एशियाटिकसोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी
[2] पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा :
- हडप्पा संस्कृती,
- वैदिक काळ,
- रामायण-महाभारताचा अन्वयार्थ,
- जैन बौद्ध धर्मांचा विकास,
- मौर्य-सातवाहन इत्यादी राजवटी,
- महाजनपदे व गणराज्ये यांची माहिती.
- भारतावरील तुर्क अफगाण आणि मुघल यांची आक्रमणे,
- मुघल कालखंड व त्याचे भारतावर झालेले परिणाम,
- भारतातील भक्तिचळवळी, संप्रदाय यांवर प्रकाश टाकला गेला आहे,
- छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य ,
- भारताचा स्वातंत्र्यसंग्राम यांचे वर्णन केले आहे,
- कला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक-राजकीय चळवळी बाबत माहिती
इत्यादी सर्व माहिती या मालिकेमधून प्रभावीपणे मांडली गेली आहे.
[3] पुढील तक्ता पूर्ण करा :
SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key,एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025 इतिहास व राज्यशास्त्र Answer Key
प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)
(1) उपयोजित इतिहास :
उत्तर :
(१) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय.
(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात.
(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.
2) ' मराठा चित्रशैली :
उत्तर : इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्थात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.
(१) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
(२) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
(३) वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
(४) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
(3) स्थळ कोश :
उत्तर : १) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.
(२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले, त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
(३) सिद्देश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थळकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारसी-ग्रीक साहित्य या ग्रंथांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
(४) स्थळ कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो.
स्थळ कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.
(प्रत्येक मुद्यास 1/2 गुण; प्रत्येक टिपेस 2 गुण; एकूण 4 गुण)
(१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्चाचा प्रयत्न असतो.
(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व'असे म्हटले आहे.
(१) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख,कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिकबखरींचाही समावेश होतो.
एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.
(१) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
(२) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.
(३) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.
(४) यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले.
ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
- मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
( हॉकी खेळाविषयी विद्यार्थ्याचे स्वमत अपेक्षित )
(१) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची
विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात.
(१) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्यागुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
(२) पोवाडा हा गदय-पदयमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
(३) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. (४) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीयस्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.
(५) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.
(६) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेखअसतात,
म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
(१) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे अतूट नाते आहे; म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते,
(२) भौगोलिक पर्यटन: अभयारण्ये, समुद्रकिनारे, नयांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.
(३) आंतरराष्ट्रीय पर्यटन: आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
(१) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे,हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.
(२) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाचीवैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
(३) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळेमदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातीलगोपनीयता कमी झाली आहे.
म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.
(१) अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा, यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- निवडणूक आयोग (भूमिका)
२. मतदार यादया निश्चित करणे,
३. निवडणुका घोषित करणे,
४. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
५. मतदानाची व्यवस्था करणे.
६. मतमोजणी व निकाल जाहीर करणे.
( वरीलपैकी कोणतेही दोन लिहिणे अपेक्षित )
- मतदार (भूमिका)
१. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे.
२. प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
३. मतदान करणे
उत्तर :
भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने :
- बेरोजगारी
- साधनसंपत्तीचे असमान वाटप
- व्यसनाधीनता
- गरीब - श्रीमंत यांच्यातील वाढती दरी
- दुष्काळ
- जातीयता
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत -
(१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक. किंवा
(२) किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
(३) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक. किंवा
(४) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
(१) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.
COMMENTS