सन २०१९-२० पासून इ.९ वी करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
👉लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात आला आहे.
👉 भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे दिले आहे.
👉अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत असे सूचित करण्यात आले आहे.
👉इ. ९ वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी...